एखादी
चूक घडल्यावर आपण आपल्याच व्यक्तीशी खोट का बोलतो ह्याचा विचार केला की एक
नाही अनेक कारण समोर येतात. अनेकदा खोट बोलण्यामागे प्रमुख कारण असत ते
म्हणजे भीती. कधी शिक्षेची तर कधी समोरच्या व्यक्तीच्या नजरेतून उतरण्याची.
पण ह्या दोन्हीपेक्षा जास्त भीती असते ते आपल माणूस गमावण्याची. खोट बोलून
नाती कधीच जपली जात नाहीत कारण सत्य कधी न कधी उघडकीस येतच आणि मग मोठ्या
प्रयासाने जपलेल नात आणि व्यक्ती आपण कायमची
गमावून बसतो. खर तर नात्यामध्ये खोट बोलण्याची गरज तेव्हाच पडते जेव्हा
तुमचा नात्यावर आणि तुमच्या व्यक्तीवर विश्वास नसतो. मग जर विश्वासच नाही
तर ते प्रेम आहे अस समजण हीच मोठी चूक असते. आपल्या व्यक्तीला काही चुका
भलेही गंभीर असतील तरी त्या विश्वासात घेऊन सांगायला हव्यात कारण जेव्हा
अशा गोष्टी इतरांकडून त्यांना कळतात तेव्हा ते अधिक धक्कादायक असत. चुका
प्रत्येकाच्या हातून होतात परंतु त्या चुकांचा परिणाम ज्यांना कालांतराने
भोगावा लागतो अशा आपल्या व्यक्तीला सत्यापासून दूर ठेवण म्हणजे तिचा
विश्वासघातच असतो. खर तर खोट बोलाव लागेल अशी गोष्ट किवा कृती होण्या आधीच
स्वतःला सावरल पाहिजे. आपल्या आयुष्यात अधिक महत्वाच काय आहे ? आपल प्रलोभन
की आपल्या व्यक्तीचा विश्वास हे एकदा ठरवलं की विचार आणि कृती दोघेही
योग्य दिशेने जातात. मग कधी आपल्या व्यक्तीच्या विश्वासाला तडा दिला म्हणून
मनात अपराधेपणा घेऊन जगाव लागत नाही की खोटेपणाची कास धरावी लागत नाही.
आपल्या नात्याला आपणच जपल पाहिजे. मोहात पडण्याआधी कुणाच्या तरी विश्वासाची
दोरी आपण तोडत आहोत ह्याची जाणीव आधी झाली तर अस घडणार नाही. व्यक्ती जवळ
असो की दूर तिचा विश्वास तर आपल्या सोबत आहेच ह्याची संवेदना जागृत ठेवावी
म्हणजे कालांतराने पश्चाताप होईल अशी कृती घडणार नाही.
.………… मिनल सबनीस
No comments:
Post a Comment
Comment Here