कोणती व्यक्ती मग ती स्री असो कि पुरुष अथवा कोणत्या पण
वयोगटातील
नकारात्मक विचारांना लवकर प्रभावित होतात .नकारात्मक विचार लवकर
स्वीकारले जाते .कदाचित याचे कारण डळमळीत आत्मविश्वास ,एखादी
गोष्ट करातांनी जर त्यात चूक झाली म्हणजे एखद्या स्रीला जर कोणी
बोलले
तुला जेवण बनवता येत नाही ,आणि ती जर शिकण्याचा प्रयत्न करत असेल .
तर तिचा आत्मविश्वास डळमळीत होतो .आपल्याला हे जमणारच नाही
हा नकारात्मक विचार ती लगेच स्वीकारते .
शाळेत जाणार्या मुला बरोबर हेच होते जर त्यांना काही विषय समझत नसेल
आणि शिक्षकांनी त्याला पूर्ण वर्गात सगळ्या समोर अपमानित केले तर
आता आपल्याला हे जमणार नाही हा नकारात्मक विचार तो लगेच
स्वीकारते .
अनेकदा ऑफिस मध्ये जर परत परत चूका झाल्या तर आपण या जॉब साठी
लायक नाही असे त्या व्यक्तीला वाटयला लागते .
परंतु जर आपण नकारात्मक विचारांना मनात थाराच नाही दिला तर .
कारण कोणती गोष्टी करातांनी आपण हे मला जमेल का ?
नाही जमले तर मला लोक हसतील का ?
लोक काय म्हणतील हाच विचार असतो .
पण जर मला आज नाही चांगले जेवण बनवता आले ,मग काय झाले
उद्या मी पुन्हा चांगले बनवण्याचा प्रयत्न करीन ,
काय झाले मला शिक्षक ओरडले तर मी उद्या त्या विषयाची
तयारी करून जाईन .असे विद्यार्थ्यांना ठरवले .
असे सकारत्मक विचार जर स्वीकारले तर !
जेवण न बनवता येणारी स्री पुढे जावून उत्तम कुक होऊ शकते .
जो विषय अवघड वाटतो त्या मध्येच विध्यार्थी पहिला येऊ शकतो .
म्हणून चांगले ते घ्या आत्मविश्वासाने यशस्वी व्हा ....
16 March 2015
आत्मविश्वास
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment
Comment Here