Pages

12 March 2015

जन्म

काही वेळेला वाटतं या जगात आपला जन्म , इथे व्यतित होणारी जीवनशैली याच्याशी आपण समरस होऊ शकत नाही.
पैसा, मानमरातब यापेक्षाही महत्वाचे आहे ते मानसिक समाधान. ते जर नसेल तर कशाचाच ताळमेळ रहात
नाही.
मग वाटायला लागतं का? आपण अवतीभवती भावनांचे जाळे विणून घेतले आहे?कदाचित त्या
मायाजालाच्या प्रत्येक धाग्याचा संबंध आपल्या प्रत्येक श्वासागणिक निर्माण होणाऱ्या तरंगलहरीशी असावा. असं वाटू लागतं या आभासाप्रमाणे असणार्‍या मायापटलावर आपण जगतो आहोत.

ज्यावेळी जीवन म्हणजे डोक्यावर हळहळणारी जखम वाटू लागते. त्यावेळी मन रडायला लागतं बाल वयातील मुलाप्रमाणे.

अन् मग अचानक सुखाची चार पाऊले नशिबाचा अंगणी आपल्या पाऊलखुणा उमवटवतात.अन् सुखाच्या मखमली रजईवर आपण मुक्तपणे विहरू लागतो. अगदी एका बाल्यावस्थेतील मुलाप्रमाणे. 

No comments:

Post a Comment

Comment Here