Pages

23 March 2015

अनुत्तरीत


खर नात कुठल ? हा प्रश्न नेहमीच पडतो. मुख्यत्वे आपल्या हातून एखादी चूक होते आणि समोरची व्यक्ती त्यावर त्याच्या मनात असलेली गरळ ओकून मोकळी होते त्या क्षणा पर्यंत आपण एका भ्रमात वावरत असतो. हेच कशाला आपण एखादी अपेक्षा केल्यावर त्याच आपल्याप्रती वागण आणि दृष्टीकोन दोन्ही बदलला जातो. " तो तुझा प्रश्न आहे " असा एखादा आपला मित्र किवा मैत्रीण जेव्हा आपल्याला सांगते तेव्हा मैत्रीच्या व्याख्येला पुन्हा तपासून बघण्यासाठी गरज निर्माण होते. मैत्रीच्या कितीही कुणी गप्पा मारल्या तरी खर्या मैत्रीची ओळख ही वेळ आल्यावरच होते, तुम्ही सतत दुसर्यासाठी काहीतरी करत रहाता. तुमचे मित्र जेव्हा जेव्हा अपेक्षा करतात तेव्हा तेव्हा स्वतःची गैरसोय होऊनही त्यांना मदतीचा हात तुम्ही पुढे करता.पण हेच मित्र आपण आयुष्याच्या नाजूक काळातून जात असताना इतके परके आणि स्वार्थाने वागून मोकळे होतात की आपला मैत्रीवरचा विश्वास उडून जातो.....अस म्हणतात वाईट वेळ म्हणजे वरदान असते कारण जोवर सगळ आलबेल असत तोपर्यंत सगळेच सोबत असतात परंतु जेव्हा खरी अडचण निर्माण होते तेव्हा नाती स्वतःच्या खर्या स्वरुपात समोर येतात. खर सांगायचं तर वाईट वेळही निघून जाते आणि आपण अडचणीतून बाहेरही येतो पण त्या काळात मिळालेल्या अनुभवातून आपल्याला आपण खूप काही शिकतो. खर नात तेव जिथे आपल्या व्यक्तीचा मग ते कुठल्याही नात्याच्या स्वरुपात असू दे एकदा स्वीकार केला तर फक्त आनंदाच्या नाही तर दुखाच्याही प्रसंगी सुद्धा आपण त्याच्या सोबत रहातो. त्याच्या पडत्या काळात त्याला एकट सोडण्याचा विचारही आपल्या मनात येत नाही. जिथे निव्वळ स्वतःच्या सोयीप्रमाणे केलेली तडजोड नसते ते नात खर असत. तुम्हाला समजून घेणारी व्यक्ती कधीच तुमच्याविषयी चुकीचा समज किवा आकस ठेवत नाही. कधी तो/ ती रागावले तरी त्यानी दिलेल्या अनेक सुखाच्या क्षणांची जाणीव आणि आठवण ठेऊन आपण त्यांना त्याच्या आयुष्याच्या वाईट काळातून बाहेर पाडण्यासाठी मदतच करतो. नात्याच्या मुळाशी प्रेम असेल तरच हे घडू शकत अन्यथा स्वार्थी आणि स्वतःपुरत बघणारी व्यक्ती कधीच कुणाचा आधार होऊ शकत नाही. जे तुमच्या पाठीशी सदैव उभे रहातात तेच तुमचे आपले असतात. काही क्षणाच्या विरंगुळ्यासाठी जोडलेल्या नात्यांकारिता कधीच त्यांना दुखवू नका हेच सांगावस वाटत.
……………मिनल सबनीस

No comments:

Post a Comment

Comment Here