कधी कधी वाटतं, आपण आयुष्यभर एकटेच असतो.
अवतीभवती नात्यांची चौकट असूनही प्रत्येकाला स्वतंत्रपणेच जीवनाचा प्रवास करावा लागतो.
मुलगी, प्रेयसी, पत्नी, आई, आजी या सर्व भूमिका निभावताना सहनशीलतेचा कस लागतो.
खरं सांगायचं झालं तर ज्यावेळी आपल्या एकाकी मनाला आपल्या माणसांची खरी गरज असते,
कित्येक वेळेला आपल्या बरोबर कुणीच नसते. आपल्यालाच पुढाकार घेऊन मनाला समजवावं लागत.
No comments:
Post a Comment
Comment Here